आयुष्यात काही क्षण असेही येतात....... ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी कधी रक्ता...
आयुष्यात काही क्षण असेही येतात.......
ज्याची वाट बघते मन, त्याचा निरोपही येत नाही
अन ज्याची नसते अपेक्षा त्याचे उत्तर येते आधी
कधी रक्ताची नातीही नकळत तुटतात
तर कधी बिनरक्ताचीही सहज जपली जातात
कधी ओळखीचे चेहरेही परके भासतात
तर कधी अनोळखीही गर्दीत आपलेसे वाटतात
आसवे ज्याच्यासाठी गळतात तो न जाणे त्याची किंमत
अन ज्याच्याकडे होते दुर्लक्ष तो मोजतो आपल्या हास्याची किंमत.
आयुष्यात काही क्षण असेही येतात...